सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

#PaytoProfessor-Part I "साला आजचा दिवस जगला ..!"


साला आजचा दिवस आपण जगला...
आज ना भविष्याची चिंता ना भूतकाळातील लाचारी..
आज फक्त मी...
ना कोणी सांगायची गरज ना कोणाच्या धमक्यांची भीती...

भीती... अहो पण कश्याची... जॉब वरून काढल्यानंतर जगणार कसे याची कि बिन पगारी काम करून करून रोज कुढत-कुढत, आतल्या आत मरत-मरत जिवंत राहायची...

अस आणि तसही रोज रोज मरण्यापेक्षा आज एकदाचे होऊन जाऊदे जे होईल ते... उद्या काय होईल ते होईल पण आज काही नाही.. आजचा दिवस माझा..

गेल्या दोन-तीन वर्ष्यांपासून सतत मनामध्ये एक विचार घोळत असतो कि, साला आपल्या आयुष्यामध्ये काय सस्पेन्स - थ्रिल नावाची गोष्ट आहे कि नाही... शिक्षित मध्यम वर्गातला जन्म, अति हुशार नाही तरी जवळपास सर्व अभ्यासात आणि कलागुणाची जाण, गुरुकुलात प्राथमिक शिक्षण , नंतर विवेकानंद कॉलेज, नंतर इंजिनीरिंग BE.. M.TECH पुढे इंजिनीरिंग कॉलेज मध्ये Asst. Professor पदावर काम करत करत PhD करण्याची इच्छा, पुण्यात स्वत:चा Flat (निम्यापेक्षा ज्यास्त पगार EMI मध्ये जात असला तरी) एवढ सर्व काही सुरळीत चालू असताना मनाची अशी फडफड का कि लाईफ मध्ये काही तरी सस्पेन्स - थ्रिल असायला पाहिजे अस..

जन्मच झाला तो स्वातंत्र्यानंतर ५०-६० वर्ष्यानी म्हणजे गुलामगिरी भोगली नाही... पोलिओ प्लेग असे आजार सुद्धा निघून गेलेत त्यामुळे मेजर असा रोग झाला आहे कि ज्यामुळे कमी दिवसामध्ये ज्यास्त जागून घेण्याची भूक लागली आहे असाही नाही.. झालीच तर कधीतरी थोडीफार सर्दी आंनी ज्यास्त चहा पिऊन पिऊन आलेलं तोंड... गाडी खूप शिस्तीत आणि नियमात चालवतो अस काही नसतानाही कधी हात पाय तुटावे असा अपघात नाही.. साला म्हणून अलीकडे असं नेहमी वाटत राहते कि आपल्या आयुष्यात कोणाला काही सांगावे अश्या गोष्टी आहेत कि नाहीत..

हो पण हे कधी पर्यत..
कालपर्यंत ची गोष्ट.. 
आज आहे माझ्याकडे सांगण्यासाठी..
कारण आज पहिल्यांदा जे केल ते स्वतःच्या मनाने.. आज पर्यंत केल ते दुसर्यांना माझ्याबद्दल काय वाटेल , माझ्या आई वडिलांना माझ्याबद्दल काय वाटेल या विचारानेच...
पण आजचा तो पहिला दिवस जो जगाला तो स्वताच्या मनाने..

४ वर्ष्यांच्या जॉब च्या एका टप्प्यानंतर मी प्रगतीचा एक पुढचा नवीन टप्पा म्हणून पुण्यातल्या एका नामांकित कॉलेज मध्ये आलो.. 

या ४ वर्ष्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील खूप नव्या गोष्टी शिकलो.. विशेषत: इंजिनिअरींग मधील..
भरमसाट वाढलेली इंजीनिरीन कॉलेज.. त्यामुळे एकूणच विद्यार्थी आणि विद्येचा खालावलेला दर्जा.. विद्यार्थी गोळा करण्यासाठी कॉलेजेस ची एकमेकांवर चाललेली कुरघोडी.. हुशार विद्यार्थी, आणि मुली यांना शेक्षणिक सवलत म्हणून कमी फी मध्ये अडमिशन च्या जागा भरण्यासाठी चालवलेला इंजिनिअरीग चा बाजार... आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. प्रोफेसर लोकांच्या पगारातील अनियमितता...
अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडणार्या एका नवीन इंजिनिअरीग कॉलेज मध्ये अडमिशन वाढविण्यासाठी चाललेल्या हरएक प्रयत्नामध्ये सर्व तोपरी भाग घेऊन शेवटी मी ठरवलं कि आता ही मरमर सोडून पुण्यात वेल-सेटल्ड कॉलेज मध्ये काम करावे आणि नवीन शक्य तितक्या गोष्टी शिकाव्यात..

म्हणून ६ महिन्यापूर्वी मी एक नामांकित संस्थेमध्ये रुजू झालो.. पगाराची अनियमितता आहे याची कल्पना असून देखील मी हा निर्णय घेतला याचे माझे मलाच आश्चर्य वाटत असे.. पण नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असल्यामुळे मी खुश होतो.. पैश्यांची थोडीफार ओढाताण होत होती पण इट्स ओके.. मिळालेल्या सोयीसुविधा पाहता त्याची झळ पोहचण्याची तीव्रता कमी वाटत होती..

डिसेंबर महिन्याचा होम लोनचा EMI गेल्यानंतर मात्र मी मोकळा झालो. मोकळा म्हणजे. पाकीट मोकळे आणि बँक अकौंटंही मोकळे.. कसाबसा FD मोडून यावेळच्या EMI ची सोय केली पण आता पुढे काय..

आधीच्या कॉलेजने तीन पगार थांबवले... त्यांना मागायला जावे तर त्यांचीच झोळी मोकळी.. ज्याना उधारी दिली त्याना मागावे तर तेही मोकळेच (जर भरलेले असतेच तर मला कश्याला मागितले असते)

आणि नवीन कॉलेज मध्ये तर पगार होण्याचा संबंधच नव्हता कारण मी येण्या पूर्वीच ८ महिन्यांचा पगार बाकी होता आणि आता टोटल १४ महिन्यांचा पगार बाकी आहे..

नक्की ही भानगड काय आहे ती मला काही समजत नव्हती.
साला पगार ही तर महिन्याच्या महिन्याला होण्याची साधी गोष्ट आहे कारण खर्च तर रोजच आहे ना... मग हे ४ महिने पगार नाही ८ महिने नाही १४ महिने नाही.. हा नक्की काय प्रकार आहे...  कारण इथले अडमिशन तरी फुल आहेत.. १००० पेक्षा ज्यास्त इनटेक आहे... या संस्थेमुळे पुण्याच्या आजुबाजुंची वीसएक कॉलेजेस बंद होण्याची वेळ आली आहे मग अस का याच उत्तर मला काही सापडले नाही.. आणि विचाराचे तर कोणाला..

साला AICTE, DTE, LIC, SPPU, NACC या संस्था नक्की करतात तरी काय मग.... महाराष्टातील जवळपास ८० %   इंजिनिअरींग कॉलेजेस ची हीच अवस्था..  नियमित पगार करणारे कॉलेज स्केल देत नाही.. स्केल देणारे कॉलेज नियमित पगार देत नाही.. आणि स्केल असून नियमित पगार देणार कॉलेज अस्तित्वात असेल अस मला तरी वाटत नाही..


या सगळ्यांमध्ये पिसला गेला तो म्हणजे मी आणि आमच्या सारखे प्रोफेसर लोक... सध्या अवस्था अशी आणि कि घरातील स्वताच्या लग्नकार्यला किंवा म्हणाल तर अगदी जवळच्या च्या अंतीम संस्कारालाही उधारी मध्ये किंवा क्रेडीट कार्ड वर NO COST EMI लग्नाचा जथ्था किंवा तिरडीचे साहित्य घ्यावे लागेल...

बर नाक घासून पू चाटून पगार होत असते तर ते ही केल असते ( already करून झालंय) पण तेही नाही... 
"रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग" याची अनुभूती येत आहे.. त्यासाठी कोणत्या महायुद्धाची गरज नाही..

रोज असे गेले १४ महिने लाचार होऊन जगणे किंव्हा मित्रांकडे.. बायकोकडे.. आई वडिलांकडे.. संस्थेकडे लाचार होऊन भिक मागणे म्हणजे रोजचे मरण नाही का... एक वेळ तलवारीने एका क्षणात मान कापून जीव गेला तरी समाधान वाटेल पण रोज असे मान झुकवून कधी होणार कधी होणार याचा विचार करत लटकत असलेली मान कधी गळून पडेल हे आता सांगता येत नाही..

म्हणून आजचा दिवस मी जगायचं ठरवला आहे...
रोजच मरण हे पुरे झाले...
आता हक्कासाठी लढताना बळी पडलो तरी बेहत्तर..
मरणाच्या अंतिम क्षणी या काही दिवसांपुरते तरी आंम्ही आमचे आयुष्यभराचे षंढत्व बाजूला ठेऊन ताठ मानेने लढलो हे आठवून श्वास सोडायला मोकळे होऊ...... 

पण हा क्षण आम्ही जिवंतपणी जगून दाखवला याचे समाधान राहील..

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

# Hidden Folder

# Hidden Folder

Study Material

सिक्युरिटी गार्डला सांगूनही त्याने त्या दोघांना हटकले नाही. शेवटी तिथल्या एका सरांनीच त्या दोघांना ओरडून हाकलून लावले. आणि त्यानंतर आम्ही किती तरी वेळ या गोष्टीवर विचार करत राहिलो..

तुला GF किंवा BF आहे का? हे विचारणे म्हणजे तू मोबाईल वापरतो का अस विचारण्यासारखा तो जोक होईल. पुण्यासारख्या शहरामध्ये शिकण्यासाठी आलेल्या कोणत्याही डिग्रीच्या मुलाला किंवा मुलीला हे विचाराने म्हणजे खरंतर मूर्खपणाच आहे. रूम, मेस, क्लास, मोबाईल आणि GF या by-default अश्या गोष्टी आहेत. 
पण
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.. नो पार्किंग मध्ये गाड्या लावू नयेत.. रेड सिग्नल असला कि गाड्या थांबवाव्यात.. या गोष्टी जश्या सहज समजणाऱ्या पण अशक्यप्राय गोष्टी आहेत. तसेच म्हणजे कॉलेज कॅम्पसमध्ये किसिंग किंवा Obscene Acts करणे..

PL मध्ये कॉलेज कॅम्पस बराचसा रिकामा असतो.. एक्झाम च्या कामासाठी येणारा स्टाफ आणि  सिक्युरिटी गार्ड सोडून सहसा कोणी कॉलेज मध्ये फिरकत नाही. नवीनच जॉईनिंग केलेल्या काही स्टाफ ना मात्र सुट्टी नसते. एका सरांच्या केबिन शेजारीच असणाऱ्या निमुळत्या रस्त्यावर एक कपल भर दुपारी रंगात आले आहे.. एकमेकांना कवेत घेऊन उभारलेल्या कपल ला पाहून त्यांना थोडं अस्वस्थ वाटलं पण पुन्हा त्यांनी स्वताला आपल्या आपल्या कामात लक्ष्य घालायला सुरवात केली. ही काही त्यांना आश्चर्य करणारी किंवा नवीनच गोष्ट अस वाटण्याचे काही कारण नव्हते. एवढ्या मोठ्या कॅम्पस मध्ये अश्या लहान सहान गोष्टी चालणारच म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. थोड्या वेळानी ते कपल गेले असेल कि अजून असेल या उत्सुकतेने त्यांनी पडदा थोडासा सरकवला. त्या कपल मधील मुलाने आपल्या GF ला मागून पडकून नवल सोबत खेळत तिच्या off shoulder टी शर्ट मधून बाहेर आलेल्या नॉटला आपल्या ओठांनी सोडत liplock केले. 
त्या स्टाफने दुसऱ्या क्षणाला झटकन पडदा ओढून घेत बाहेर जाऊन  सिक्युरिटी गार्डला सांगितले.  सिक्युरिटी गार्डला सांगूनही त्याने त्या दोघांना हटकले नाही. शेवटी तिथल्या एका सरांनीच त्या दोघांना ओरडून हाकलून लावले.

चिडलेल्या त्या स्टाफने आपल्या कलीगसना ही गोष्ट सांगितली. अश्या प्रकारच्या गोष्टी कॉलेज कॅम्पस मध्ये कोणत्याही परिस्थितीत झाल्या नाही पाहिजेत असे त्याचे म्हणणे... आता खरंच ही गोष्ट चुकीची आहे यात शंका नाही पण.. डिस्कशनचे अनेक मुद्दे होते. जसे कि अश्या गोष्टी कश्या काय होतात तेही कॉलेज कॅम्पसमध्ये.. त्याला जोडूनच दुसरा मुद्दा आला कि  कॉलेज कॅम्पसमध्ये ही गोष्ट जर चुकीची असेल तर मग मुव्ही थियेटर, z ब्रिज सारसबाग, शनिवार वाडा.. कॅम्प, सिंहगड अश्या पुण्यातल्या चिक्कार ठिकाणी चालणारी गोष्ट बरोबर आहे का... साहजिकच जर नसेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ती चालते कशी.. आणि जर बरोबर असेल तर ?????

कोणी म्हणाले कि अश्या गोष्टी इग्नोर करा..
कोणी म्हणाले कि आताची जनरेशन तशीच आहे.. आणि कुठेही अस करू नये अस लिहिलेलं नाहीये..
कोणी म्हणाले कि आपण जर त्या ठिकाणी असतो तर काय केले असते..
आपल्याला अस काही करता आले नाही म्हणून जळतो कि काय...
त्यांनी केले त्यांचे ते बघू देत... आपल्या हातात काय आहे..
कोणी म्हणाले.. आजपर्यंत कोणी BP बघितले नाही सांगा.. (आम्ही सगळे गप्प) मग जगाला शहाणपणा सांगण्याची काय गरज... वगेरे वगेरे...
डिस्कशन संपेपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहचलो कि ज्यास्तीत ज्यास्त आपण इतकेच म्हणू शकतो कि इतकेच जर तुंबले असेल तर बाळानो ही घ्या माझ्या flat ची चावी आणि जा... उरकल कि फक्त चावी परत आणून द्या... 
आम्ही हसलो आणि चर्चा संपवून घरी निघालो..  

रात्री असच एका मित्राने Whatsup वर मेसेज पाठवला..

We’re the middle children of history, man. No purpose or place. We have no Great War. No Great Depression. Our Great War’s a spiritual war… our Great Depression is our lives. We’ve all been raised on television to believe that one day we’d all be millionaires, and movie gods, and rock stars. But we won’t. And we’re slowly learning that fact. And we’re very, very pissed off.”


आपण इतिहासाच्या अश्या एका मधल्या टप्प्यावरची मुले आहोत, जिथे आपल्याला इतिहासात कुठेही जागा नाहीये .. कोणताही मोठा उदेश्य नाही. कोणतेही युद्ध नाही , डिप्रेशन नाही.. आमचे महान युद्ध एक आध्यात्मिक युद्ध आहे ... आमचे सगळ्यात मोठे डिप्रेशन  आमचे रोजचे जगणे आहे.  आपण अश्या प्रकारच्या TV वरच्या सेरीअल्स आणि मुव्ही बघून विश्वास ठेवतो की एक दिवस आपण सगळे कोट्याधीश असाल  आणि रॉकस्टार यांच्यासारखे असाल. पण आम्ही  नाही असे काहीच नाहीये.  आपण हळूहळू खरं शिकत आहोत कि सर्व सोयी सुविधांनी युक्त जीवन आपले "झंड" (Pissed Off ला योग्य  शब्द हाच वाटला)  झाले आहे. 


पब्लिक प्लेस मध्ये किंवा कॉलेज कॅम्पस मध्ये वाढणाऱ्या या नव्या संस्कृतीला आपण पाहायचे ते कसे?
सध्या सर्व काही इंटरनेट वर उपलब्ध आहे. सगळ्या सोयी इतक्या सहजतेने मिळत आहेत कि काळजी करावी असे काहीच नाही. १५ मिनिटात आपण १ GB पर्यंतचा डेटा डाऊनलोड करू शकतो.. अस असेल तर अभ्यासाचे ते किती आपण पाहतो. किती आपल्या कामाचे पाहतो. एका सर्वेक्षणानुसार २१ ते ३० या वयातील मुले आणि मुली यांचा दिवसाचा इंटरनेट चा उपयोग हा जवळपास १२ तास आहे पैकी फक्त २ तास हा कामासाठी आणि नंतर इतर उद्योगासाठी..

ज्या इतर उद्योगांना आपण म्हणतो "Hidden Folders"... 
तसा तो आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो.. डोक्यात असतो.. 
अश्या गोष्टी ज्या आपण उघडपणे बघितल्या कि नकोश्या वाटतात पण आपण एकटे असू तर केल्याने काही फरक पडणार नाहीत असा विचार करतो...

त्या कराव्या कि नाही याच्यासाठी आपल्याकडे कधी शिक्षण देण्यात येत नाही.